मानवत शहरातील वेताळ मंदीराच्या जिर्णोद्बारासाठी दानशूर भाविकांनी पूढाकार घ्यावा
मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहर अध्यात्मिक , कला, सांस्कृतिक , धार्मिक परंपरेने नटलेले वारसा असलेले शहर असून सांस्कृतिक वारसा जपणारे शहर अशी ख्याती असून मानवत शहरातील प्रसिध्द असलेले मोठ्या मारुती मंदिरासमोरील वेताळ महाराजांचे प्राचीन मंदिराची जीर्ण अवस्था झाली आहे. त्यामूळे हे मंदीर कधीही कोसळेल या शंकेच्या भिती मूळे या मंदीराचा जिर्णोद्बार करावा अशी मागणी मानवत शहरातील भाविकामधून व्यक्त केल्या जात असून मानवत शहरातील दानशूर भाविक भक्तांनी पूढाकार घेण्याची गरज असल्याचे मत भाविक भक्त व्यक्त करीत आहेत.
मानवत शहरातील सर्व सुजान भाविक दानशूर भक्तांनी याकडे लक्ष द्यावे व सर्वांनी मिळून एक कमिटी स्थापन करावी व मंदिराचे काम सर्वांच्या सहकार्यातून पूर्णत्वाकडे नेण्यासाठी भाविकभक्तांनी मदत करावी असे आवाहन भाविकांमधून केल्या जात आहे.
**