https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ईरळद येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम साप्ताह निमित्त विज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. ईरळद येथे अखंड हरीनाम साप्ताह सुरु असून साप्ताह दरम्यान महावितरण कंपनीने विज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २६ डिसेंबर रोजी विजवितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांच्या कडे एका निवेनाद्वारे करण्यात आली आहे.
दर वर्षी प्रमाणे याही वर्षे अखंड हरी नाम साप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांनी मौ. ईरळद येथे केले असून २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२३ पर्यंत चालणाऱ्या सप्ताह दरम्यान महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने सकाळी ५ ते ९ या वेळेत होणारी लोड सेडिंग (भारनियमन ) बंद करावे आणि विज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे कोल्हा सर्कल प्रमुख माऊली भाऊ मुळे, सरपंच अशोक कचरे, संदीप मुळे, नंदू बारहाते, अमित देशमुख यांच्या सह नव निर्माण सेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704