पाण्या अभावी* शेतकऱ्याचे संत्रा बागेचे नुकसान ; नुकसान *भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची शेतकरी पांडुरंगजी शिंदे यांनी केली मागणी
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. मानोली येथील शेतकरी पांडुरंगजी शिंदे यांनी मोठया प्रणात संत्रा फळ बागेचे पिक घेतले आहे.
परंतु वाढती उन्हाची तीव्रता यामुळे जमिनीतील पाणी पातळी मोठया प्रमाणात खालवली असून पाण्या अभावी शेतकऱ्यांच्या संत्रा बागेचे मोठे नुकसान होत त्या मुळे सदरील पिकाचा प्रशासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी पांडुरंगजी गंगाधर शिंदे यांनी तालूका प्रशासनाकडे केली आहे. केवळ पाण्या अभावी संत्रा बागेचे नुकसान झाल्यामुळे पाण्याअभावी खरेदीदार ही संत्रा माल घेवुन जात नाही जाग्यावरच मालाची गळती होत असून मोठया प्रमाणात माल खराब होत आहे. त्यामुळे तालुक्यातील मानोली शिवारा तील शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले असून तहसील व कृषी सेवक यांनी जायमोक्यावर येऊन सदरील फळ बागेचा तात्काळ पंचनामा करावा व सानुग्रह व बाग पुर्नजिवीत करण्या साठी अनुदान व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी पांडुरंगजी शिंदे यांनी केली आहे.
***